रामनवमी Ramnavami
रामनवमी- श्रीरामनवमी
महारष्ट्रात मोठ्या उस्ताहत साजरी
केली जाते. श्रीराम
हे सर्वांचे आवडते
दैवत. जण कल्याणासाठी,
जगाच्या रक्षणासाठी,
दुष्टांच्या संहारासाठी विष्णूंनी
जे दहा अवतार घेतले, त्यामध्ये श्रीरामाचा सातवा अवतार. श्रीरामनवमी हि
चैत्र शुद्ध नवमीला
साजरी केली जाते,
रामनवमी म्हणजे श्रीरामांचा जन्मदिवस
होय .
श्रीरामाचा अवतार त्रेता
युगांत झाला. अयोध्येचे राजा दशरथ
त्यांना तीन राण्या.
कैकई,सुमित्रा आणि
कौशल्य. त्यांना पुत्र संतान
नव्हते. राजाला वारस
नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते.
राजाला पुत्र व्हावा म्हणून
राजाने पुत्रकामेष्टी
यज्ञ केला. अग्निदेवता प्रसन्न झाले.
त्यांनी राजाला प्रसाद फळे
दिली. तो प्रसाद
खाल्ल्यानंतर, तीनही राण्यांना पुत्र
प्राप्ती झाली . त्या राजपुत्रांचीनामकरण
मोठ्या थाटात झाले. राम,
लक्ष्मण, भरत,शत्रुघ्न
अशी नावे ठेवण्यात
आली.
श्रीराम अतिशय आदर्श
व्यक्तिमत्व , राज्निष्ठ आणि एकवचनी
राजा होऊन गेले.
श्रीरामांनी लहानपणीच गुरुंच्या यज्ञांचे
रक्षण केले.
राक्षसांचा संहार केला. स्वयंवर
जिकून सीतेशी लग्न
केले. राजगादीवर बसणार
तोच राज्याच्या आज्ञेप्रमाणे
चौदा वर्ष वनवासाला
गेले. सीता रक्षणासाठी
रावणाचा वध केला.
या आदर्ष
देवतेचे आपल्याला कायम आठवण
रहावी म्हणून रामनवमी
साजरी केली जाते.
रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा
वाजता पाळणा हलवून
राम जन्मोस्तव साजरा
केला जातो.
रामनवमीच्या दिवशी मंदिरांमध्ये भजन,
पूजन कीर्तनाचे कार्यक्रम
होतात. जागरण केले जाते,
प्रसाद देऊन कार्यक्रमाची
सांगता केली जाते.
श्रीराम हे सर्वांचे
आवडते दैवत असल्याने
सर्वच या कार्यक्रमात
सहभागी होतात. श्रीराम आपल्या
सर्वाना सुख, शांती
देवो ही ईश्वर
चरणी प्राथर्ना ……